लग्न झाल्यानंतर मुळात कनिष्काच स्वतःचा व्यवसाय सुरू करणार होती, आणि त्यासाठी लागणारे भांडवल हे राहुलने त्या त्या वेळी साठवणे सुरू केलेले होते. त्यामुळे बऱ्यापैकी भांडवलाचा प्रश्न हा काही मोठा विषय राहिला नव्हता.
व्यवसाय कशाचा करायचा हा ही काही खूप मोठा प्रश्न नव्हता. कारण कनिष्का तांत्रिक रित्या समृद्ध होती. व्यवसायाचे स्वरूप रूपरेषा यावर राहुल आणि कनिष्का यांचे मंथन चालू होते. पण संकल्पना यावर त्यांचे एकमत होईना. म्हणून दोघांनीही आजूबाजूला बाजार फिरवून, नवीन काही करता येईल का यावर संशोधन करावे एकमत झाले. आणि रोज सायंकाळी कॅफेज् मध्ये, छोट्या रेस्टॉरंट मध्ये, बेकरीला भेटी दिल्या. त्यातून त्यांना कळले आणि लक्षात आलं की रात्री च्या जेवणानंतर inccream च्या दुकानां नंतर वेगळे असे काही जगाचं नाही. म्हणून त्यांनी एक नवीन संकल्पना साकार केली. “जेवणानंतर चे कॅफे”. कल्पना तर भन्नाट होती आणि ती दोघांना मनापासून आवडली.
आता या कॅफे ची जागा आणि मेन्यू काय ठेवावा, या वर चर्चा सुरू झाल्या यात आई आणि बाबा पण काही सुचवत असत.
ह्यामुळे राधा ला भरपूर वेळ देता येईल अशी भन्नाट कल्पना हळूहळू प्रत्यक्षात येऊ लागली. मग नाव काय ठेवायचे पासुन जागा या वर चर्चांचे उधाण यायला लागले. आई बाबा नी तर नावावर “vito power” स्वतः कडे ठेवला त्यामुळे त्याच्या म्हणण्या प्रमाणे “RADHA POST DENNER CAFE AND MORE” ठरले.
साहित्यांच्या याद्या बनणे सुरू झाले ज्याला त्याला जे जे आठवलं तो ते लिहून ठेऊ लागला. तांत्रिक बाबींच्या बाजू कनिष्का नी सांभाळून घ्यावे हे अलिखित होते. यादी प्रमाणे समान किंमत आणि गुणवत्ता बघून खरेदी करणे हे राहुल चे काम सुरू झाले.
आत्ता नोकरी की व्यवसाय असा प्रश्नच उरत नव्हता……..
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६