आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कवितेचे रसग्रहण .
आत्मबल
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ||
आत्मबल
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ||
अट्टहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गांठ घांलू मी घुसें रणी
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितों
भिउनी मला भ्याड मृत्यु पळत सुटतो
खुळाs रिपु तया स्वये
मृत्युच्याच भीतीनें भिववुं मजसी ये ||
लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकतें
हलाsहलाs त्रिनेत्र तो
मी तुम्हांसी तैसाची गिळुनि जिरवितों ||