नागपूरचा इतिहास 10 जुलै 2026
गोंडवन देवगढ राज्य
नागपूर नगर
इ.स. 1699 मध्ये लष्करी मदतीकरता गढ मंडलाचे राजा नरिंद शहाकडून राजा बख्त बुलंदशहाला सिवनी डोगंरताल व घनसैर हे गढ मंडला राज्याचे प्रांत प्राप्त झाले.
राजा बख्त बुलंद शहाने त्याचे नातेवाईक रामसिंह यास या प्रांताचे प्रमुख नेमले. राजा रामसिंह याने छपरा सिवनी येथे मुख्यालय करून किल्ला बांधला. नंतर देवगढ लष्कराच्या राजाखान पठानच्या पठानी तुकडीने सिवनी प्रांत घेतला.
देवगढचे राजा बख्त बुलंद शहा यांनी इ.स. 1701 मध्ये मोगलांचा व-हाड सुभा जिंकुन घेतला. या सुभ्यात पश्चिम विर्दभाचे रामटेक , नागपूर ,भंडारा , उमरेड हे प्रांत असून रामगिरी अथवा रामगड ,अंबागड सोनगडी प्रतापगड पवनगड हे गड होते. नंतर राजा बख्त बुलंद शहा यांनी देवगढ येथे भव्य गड बांधला आणी नवे नागपूरनगर वसविले.
इ.स. 1701 मोगलांचा व-हाड सुभा जिंकून घेतल्यानंतर देवगढचे राजा बख्त बुलंद शहाने इ.स. 1702 नागपूर नगर वसविले असे इंग्रज अधिकारी जेनकिन्स तसेच इतिहासकार य.म काळे यांचे मते योग्य नाही कारण इतिहासकार डॅाक्टर भालचंद्र अंधारे यांनी इ.स. 1709 पुर्वी नागपूरनगर अस्तित्वात होते असे असे देवगढचे गोंडराजे या त्यांचे पुस्तक खालिलप्रमाणे सिध्द केले
1 अकबरनामात उल्लेख केल्याप्रमाणे इ.स. 1563 पुर्वी देवगढ राज्य अस्तित्वात असून इ.स. 1564 पावेतो गढ-मंडला राज्याच्या अधिन होते. नंतर इ.स. 1578 मध्ये तुकोबा नामक देवगढच्या राजा यांने इ.स. 1578 मध्ये नागपूरच्या जोशी घराण्यास सनंद दिली.
2 देवगढच्या जटबा राजांने 8 फेब्रुवारी इ.स.1612 रोजी नागपूरच्या जोशी घराण्यास सनंद दिली होती
3 नंतर राजा कोकशहा याने 4 शुध्द श्रावण समन 1691 म्हणजेच 19 जुलै इ.स. 1634 रोजी नागपूरच्या जोशी घराण्याची संनद कायम करून मुंकुद जोशी आणी नाग जोशी यांना दान पत्र. त्यामूळे राजा बख्त बुलंद शहाने नागपूर
नदीवर्धनपूर चा वाकाटक राजा धर्म महाराज रूद्रसेन -1 यांची माता हि मध्य देशाच्या पद्मावतीचे नागवंशिय राजा भवनाग यांची कन्या होती तिने इ.स. 335 ते इ.स. 360 प्राचिन नागपूरनगर वसविले असावे.
इ.स. 1600 मध्ये मोगलांनी पश्चिम विर्दभ बळकावून तेथे व-हाड सुभा केला . नंतर मोगलांनी या प्रदेशात अराज्यक माजविल्यांने प्राचिन नागपूर नगराचा -हास त्याजागी होवून लहान लहान वसाहती झाल्या होत्या.
राजा बख्त बुलंद शहाने इ.स. 1702 मध्ये यथाशक्ती नागपूरनगराचे पुर्ननिर्माण करून तेथे भुईकोट बांधला. राजा बख्त बुलंद शहा यांनी नवे नागपूर वसविले व त्यामूळे प्राचिन नागपूरनगर पुन्हा नावारूपास आले!
इ.स. 1709 मध्ये निधन झाले राजा बख्त बुलंद शहाचे. नंतर पुत्र चांद सुल्तान देवगढच्या गादीवर बसला. तेव्हा नागपूर येथे देवगढ राज्याचा लष्करी तळ होता.
राजा चांद सुल्तान यांनी लष्करा करता नागपूरनगरा बाहेर तलाव खोदला. पूढे हा तलाव शुक्रवार तळे म्हणून प्रसिध्दिस पावला!