||स्वच्छ भारत||
स्वच्छताः सर्वधनं, स्वच्छताः सर्वरोगहरम्।
स्वच्छताः सर्वसुखदं, स्वच्छताः सर्वलक्षणम्।
अर्थ: स्वच्छता ही सभी धन है, स्वच्छता सभी रोगों को दूर करती है। स्वच्छता सभी सुखों को प्रदान करती है, स्वच्छता सभी लक्षणों को प्राप्त करने में सहायक होती है।
स्वच्छ भारत अभियान हे जरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा आहे, तरी महात्मा गांधींनी ही याचे स्वप्न बघितले होते. आणि त्यासाठी कामही केलेले होते.
पण स्वच्छ भारत अभियानाचे जनक हे संत गाडगेबाबा आहेत. हो!! हो!! संत गाडगेबाबा तेच ते ज्यांच्या हातात एक खराटा राहतो. ते गावात गावात जाऊन त्यांचे कीर्तन करत असत आणि त्यापूर्वी ते स्वतः कीर्तनाचा परिसर स्वच्छ करत असत, आणि कीर्तनानंतर त्या गावात थांबून, सांडपाण्याचा निसरा करणे, नदी किनारे शौच न करणे यासाठी जागृती करणे. हे त्यांचे नेहमीचे काम होते. आपल्या कीर्तनातून ते शिक्षणाचे महत्त्व सांगत, शिक्षणासाठी आग्रही धरत असे, म्हणूनच आज “अमरावती विद्यापीठाचे ” नाव त्यांच्या नावाने ठेवलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान सुरू करून दहा वर्ष झाले, आणि त्या अभियानाचा पहिला टप्पा घरोघरी संडास बांधणे हा होता. तर दुसऱ्या टप्प्यात घरोघरी स्वच्छ पेयजल पुरवणे हा होता.
पण मित्रांनो आजूबाजूची जी घाण किंवा परिसर हा स्वच्छ करणे, ही जनजागृती अभियानाची गोष्ट आहे. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घाण होऊ नये हे जनआभियन व्हावे यासाठी जबाबदारी घ्यावी. आणि कोणाला करूही देऊ नये हे जन अभियान आहे. मुके जनावरे सुद्धा जबाबदारीने वागतात.
या सरकार जास्तीत जास्त आर्थिक मदत देऊ शकते. पण साफसफाई किंवा स्वच्छता हे करावे लागणार आहे आणि मोठे जन अभियान होऊन, ही चळवळ यशस्वी होणार या प्रयत्न करावे. आपल्या आजूबाजूला अजूनही तशी परिस्थिती झालेली नाही हे खेदाने आणि जबाबदार मी सांगतोय.