||सरकारी नोकरी||
कधी वाटते घ्यावी सरकारी नोकरीची मजा पण,
स्वप्नांच्या मागेच लागलेली आहे सजा
खासगी नोकरीचीही मजल कठीण,
पण मनात समाधान मी काहीतरी करतोय हाच जिणं.
“ज्ञानेश्वर अल्लाद ” यांची ही कविता स्वतःच सरकारी नोकरीचे घुसमट सांगते.
पण खरंच का हो? सरकारी नोकरी सोन्याची खाण आहे का? पण तुम्हीच विचार करा, एक साधे से गणित आहे. पूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय आणि राज्य शासनाच्या एकूण ४५ ते ५० हजार जागा निघत असतील. अंदाजे ५ करोड लोक त्या जागांसाठी अर्ज भरत असतील. गुणोत्तरा प्रमाणे याचा विचार केला तर 1 अर्जदार, प्रत्येक हजारा अर्जदारा मागे नोकरी प्राप्त करतो म्हणजे ९९९ लोकांना पुन्हा प्रयत्नना लागून कसोशिने मागे लागावे लागते. काही उच्च कोटीचे शिकवणी वर्ग काही लाखांमध्ये फी आकारतात, मग ते अपयश किती महागात पडतं, याचा हिशोब त्यांना नैराश्याच्या सावल्या त्यांना घाबरवतात, समजावून सांगतात.
यात भ्रष्टाचाराचा विचार केला तर सरकारी नोकरीसाठी कित्येक माय बाप आपले धनसंपत्ती जमापुंजी पणाला लावून, ती नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करतात . कारण फक्त एकच होतं ती म्हणजे आयुष्यभर त्याला आणि त्याच्या जोडीदाराला पेन्शन मिळून आर्थिक पाठबळ राहायचं. पण आता 2004 पासून सरकारनी 'pay scales” आधारित पेन्शन बंद केलेली.
आहे तरीही लोक सरकारी नोकरीसाठी का आपले सर्वस्व पणाला लावतात, आणि मग अपयशाला आत्महत्या पर्यंत नेतात.
का? का? का? ह्या सरकारी नोकरी मागे सर्वस्व गमावून बसतात. तरीही त्यामागे वेड्यासारखे धावतात.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६