भारतामध्येच का, पूर्ण जगातही अनेक छोटे-मोठे मंदिरे असतील जिथे मुख्य मूर्ती ही स्थिर, आणि एका जागी प्रस्थापित करून तेथून हालवली जात नाही. फक्त शक्तिपीठाचे बोलायचे झालेत तर, श्री तुळजाभवानी हे एकच असे देवस्थान आहे. येथील श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही चल स्वरूपात आहे. आश्चर्य वाटले ना! हो ही मूर्ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालवली जाते. पूर्ण महाराष्ट्राचे कुलस्वामिनी असलेले तुळजाभवानी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली शालिग्रामी दगडाच्या मुर्तीची रोज पंचामृतांनी अभिषेक केला जातो. तरी त्या मूर्तीची झीज झालेली नाही. जसे तर काही ठिकाणी दिसते.
या मागची मूळ संकल्पना किंवा मुख्य कारण, माता वर्षातून २१ दिवस मंचकी निद्रा घेते. म्हणजेच ज्या जागेवर ती स्थित असते त्या जागेवरून तिला हलवून एका मंचकावर निद्रा अवस्थेत झोपलेली जाते. अशी मान्यता आहे महिषासुरा बरोबर झालेले घोर युद्ध आणि त्यामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी माता पाच दिवस निद्रा घेऊन आराम करते. या दिवसांमध्ये अभिषेक पूजा केली जात नाही, पण शृंगार आणि आरती पूजा केली जाते.
शारदीय नवरात्राच्या आठ दिवस पहिले माता ची मंचकीनिद्रा सुरू होते. या निद्रेला “घोर निद्रा” असे म्हटले जाते असे प्रचलन आहे. शारदीय नवरात्राच्या दहाव्या दिवशी म्हणजे आपण दसरा साजरा करतो त्या दिवशी पुन्हा अजून माता पाच दिवसासाठी निद्रस्त होते. याला “श्रम निद्रा” असे म्हणतात. शाकांबरी नवऱ्याच्या पूर्वी सुद्धा आठ दिवस माता मंचकी निद्रा घेते. या निद्रेला “मोह निद्रा” असे म्हणत असते. असे एकूण वर्षातून २१ दिवस तुळजाभवानी माता “मंचकी निद्रा” घेते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रस्थापित जागेवरून ती उचलून मंचकावरती निद्रस्थ अवस्थेत ठेवली जाते.
तुम्हाला पण याची माहिती/कल्पना आहे का? असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करा.