तुक्या रचिलीस पाया विठू माऊली चढविला सी कळस. मुळात आताच्या भागात राहुल आणि कनिष्का चा व्यवसाय एका अश्या मोड ला आला आहे की सायंकाळचे वेळ सोडून त्यांना करायला काही राहिले नाही. राधा सुद्धा आता शाळेत जायला लागली. मग दुपारच्या वेळी करायला काही तरी करावे असे चालू होते आणि तेही आपल्या चालु व्यवसाय न बदल करता वा मदत करणारे असावे. मग कनिष्काने म्हटले आपण “traffles” हे ऑनलाईन पुर्ण भारतात पोहचू शकतो. आणि ते पक्के झाले ऑनलाइन सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या वेबसाइट वर नोंदणी केली.
पण आता त्याचा व्याप एवढा वाढला की त्यांना आता घरची जागा कमी पडायला लागली. म्हणून एक नवीन जागा घेतली. आणि त्यासाठी काही शिक्षित बायकांची भरती केली. काही काम बाहेरून करून घेण्यासाठी काही करार केले. अशा प्रकारे त्याच्या व्यवसायाला जोडल्या गेलेल्या लोकांची संख्या आता १०० वर पोहचली. अश्या प्रकारे राहुल आणि कनिष्काने पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असताना त्यांनी बघितले. बघता बघता राधा आपले शिक्षण पूर्ण करून त्यांच्या व्यवसायात मदत करू लागली.
राधाच्या नेतृत्वात वितरकांचे जाळे विणले सुरू झाले. त्यासाठी राधा ने काही नवीन नियुक्ती केली आणि ते काम बघण्यासाठी पुन्हा एक नवीन कार्यालय घेण्यात आले.
आता फक्त व्यवसाय व्यवसाय व्यवसाय!!!
या कथेतून संदेश असा आहे की अनुभवासाठी नोकरी करा आणि मग साजेसा व्यवसाया बद्दल विचार करा.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६