कुठलीही शक्ती/ ऊर्जा चांगली किंवा वाईट नसते तिला दोन्हीं बाजू असतात ती चांगली असेल किंवा वाईट. ह्या सर्व ऊर्जा ला दोन प्रकारात विभाजन करता येते. काही ऊर्जा अचेतन आणि चेतन. ज्या ऊर्जा कोणत्यातरी पद्धतीने नियंत्रिक ठेवावी लागते. पण काही ऊर्जा ह्या चेतन असतात त्यांचे आदर करणे भाग आहे. ह्यांना बाह्य नियंत्रणाची गरज नसते. ते आपल्यामध्येच एक ऊर्जा आहे.
ऊर्जा ही अमीट असते ती संपत नाही, स्वरुप बदलू शकते. जसे पाणी ही शक्ती आहे, ती बाष्प बनते ती सुद्धा शक्तीचेच रूप आहे. अग्नी, आपली विद्युत, अणू ऊर्जा ही सगळी एक अचेतन ऊर्जेचे स्वरूप आहे. ह्या सगळ्यांना अचेतन ऊर्जा आहे असे आपण म्हणतो. कारण त्यांना कोणाला तरी नियंत्रक ठेवणे आवश्यक आहे. त्यांना नियंत्रणात ठेवले नाही तर मग ते एक विध्वंसक रुप धारण करतात. आणि कुठल्याही अनर्थ होऊ शकतो, नाही होणारच.
पण सजीव चेतन ऊर्जा जशी माता शक्ती पर्वती, श्री लक्ष्मी ह्या सुद्धा एक ऊर्जा आहेच. ज्यांच्या मुळे हे जग अपुरे आहे वा अस्तिवात आहे ती ही नरी शक्ती. ही सुद्धा चेतन ऊर्जेचे एक स्वरुप आहे. ह्या ऊर्जेत चेतन असे म्हटले आहे, कारण ही सजीव आहे, आणि ही स्व नियंत्रित आहे. बाह्य बळाची गरज नसते.
जन्मा पासून आई एक ऊर्जेच स्वरूप आहे. तिच्या ऊर्जे मुले मुली मोठे होतो. तीच ऊर्जा नंतर आपल्या अर्धांगिनी मधे हिचीच त्या ऊर्जेचे स्वरूप होते. आणि तीच ऊर्जा ती आपल्या मुलीला आणि सुनेला प्रदान करते.
थोडक्यात आपल्या आयुष्यात कोणतीही स्त्री एक ऊर्जेचे स्त्रोत असते. म्हणून आपल्या कुठल्या ही धर्मात स्त्रीचा आदर हे धर्माचरण आहे.
#सुरपाखरू #३०दिवसात३० #जुलै२०२६