*जो जे वांछील तो ते लिहो..* मराठीत लिहून व्यक्त होणासाठी मार्गदर्शक ठरणारा कालचा नागपूर येथे आयोजिलेला कार्यक्रम उत्तम झाल्याच्या प्रतिक्रिया वाचल्यात. सर्व वक्ते, आयोजक तुषार सर आणि सर्वांचे अभिनंदन..
🙏🙏
देखणा नेटका अप्रतिम अशा अनेक विशेषणांनी या उपक्रमाचे कौतुक जाणकारांनी केले आहे .
काहींचे विचार कदाचित काहीसे पटले नसतील.जेव्हा आपण विचार करतो तेव्हाच साधकबाधक विचारांती निर्णयाचे नवनीत मिळते, पण एवढं सर्व करून आज घेतलेला निर्णय भविष्यात तो निर्णय म्हणजे एक मोठी चूक ठरु शकते.अगदी शास्त्रात देखील कित्येक काळ अचूक वाटाणारी मान्यता प्राप्त गोष्ट चूक ठरू शकते.पृथ्वी गोल आहे म्हणणाऱ्याला शास्त्रज्ञाला लोकांनी वेड्यात काढले होते.
व्यक्त होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे.बोलणे लिहिणे कृती करणे ही व्यक्त होण्यासाठी उपलब्ध असलेली साधन.. त्यात काळाच्या पडद्यावर अनेक शतक टिकून राहणार साधन म्हणजे लिखाण. आपल्याला जसं आपण जेवणात जे आवडत तेच खातो न आवडणार आपोआप बाजूला राहत. तस काहीस सर्व प्रकारच्या व्यक्ततेबद्दल आहे..तुम्हांला जे रुचत तेच तुम्ही व्यक्त करतात. त्यात लिहिणही आल. व्यक्ततेला बंधनात ठेवू नये, कोणास काय वाटेल म्हणून तुमच्या मनातले विचार वा लिखाण कोंडले जाऊ नये किंवा लोकांना ते पटत नाही आवडत नाही म्हणून ते लिखाण टाळण म्हणजे स्वतःशीच प्रतारणा केल्यासारखे आहे.
प्रेम कुणावर करावे हे सांगताना कुसुमाग्रजांनी अनेक दाखले दिले आहेत तसेच अगदी एका शब्दापासून अनेक विषयावर लिहीण सहज शक्य आहे.
*जो जे वांछील ते तो लिहो..* यात लिहिण्याची क्रिया महत्वाची आहे. एखाद्या चित्रपटची कथा एकदम सुचत नाही जस जसं लेखक लिखाण करतो त्यात हळूहळू अनेक पात्र जन्म घेता आणि प्रसंगाची शृंखला विणली गेली अजरामर कथानक तयार होते. तसेच लिहिण्याबाबत आहे भावनांचे नवरस आपल्या भाषेत आपण लिहिण्यात उतरवू शकतो.
” वांछील ते तो लाहो ”
प्रार्थना ही पसायदानची
*”वांछील ते तो लिहो”*
साद सुरपाखर घालती !
लिहिल जरी खूप काही
रद्दी वाटते ती कुणाला
उब त्या रद्दीचीही लेखकास
जशी बाळाची आईला!
“सौ बका.. एक लिखा “
व्यवहार म्हणता त्याला
इतिहास लिहिला जाता
दाखला मिळे नवपिढीला!
भाषा शुद्ध की अशुद्ध
जरा ठेवावे ते बाजूला
खान्देशीबोलीत बहिणाबाई
सोडवे मनाच्या कोड्याला!
अनेक शब्द परकीय भाषेचे
सामावले मराठीच्या पोटात
सौंदर्य तिचे अजून बहरले
बदल काळाचा खरा नियम!
आनंदासाठी लिहणं हवे
नको कौतुक फळाची अपेक्षा
गीतेतील कर्मयोग आचारा
लिहिण्याचे कर्म ते नित्य करा!
सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व सुरपाखरांचे अभिनंदन.
🌹🌹🌹🌹
.. हेमंत नाईक