आत्महत्या
असूर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृताः।
तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः॥
(ईशावास्योपनिषद 3)
हिंदू धर्मानुसार, आत्महत्या करणे हा सर्वात मोठा गुन्हा असून त्याचे पाप लागते.
आत्महत्या करणे हा एक फार सोपा पर्याय झालाय का? जिंकलो तर जीवन? आणि हरलो तर मरण? असं समीकरण झालंय का?
NEET, TET, UPSC, MPSC, JET आणि अजून काही अशा अनेक स्पर्धा परीक्षा, हे तर फक्त प्रवेश द्वार आहे सफल झाला, तर पहिली पायरी चढल्याचा आनंद. पण असफलतेचे दार आत्महत्येच्या खोलीत येऊन थांबतं. ” सांख्यिकी गणितात ” अडकायचे झालेत तर हे सर्वांनाच माहिती आहे प्रत्येक जण पास होऊनही पुढच्या पायरीवर जाईलच असे नाही तरीही हा टोकाचा निर्णय का? आणि सफल झाला, तर खूप मोठ्या डोंगरावर सफलतेचे मुकुट सजलेले असते. त्यासाठीही अनेक पढाव पार करावे लागतात मान्य आहे.
कौटुंबिक अपेक्षांचे ओझे विशेषतः पालकांचे किंवा स्वतःचे सुद्धा काही अंशी जबाबदार असतील, तरीपण मानसिक कमकुवता, व्यक्त न होण्याची संकोचितता वा व्यक्त होण्याचे माध्यम यातील, काहीतरी तर जबाबदार आहेत.
मुलांना/ मुलगी आपल्या आई-वडिलां शी किंवा मित्र-मैत्रिणींचे बोलणे एवढे अवघड झाले आहे का? अथवा संभाषण कठीण झाले आहे का? मुलांची घालमेल होते आहे हे पाल्यांच्या लक्षात येत नाहीये का? आणि आले तरी ते संभाषणाने सोडवता येईल इतके पलीकडे गेलेले आहे का? पाल्य आणि पालकांचे संभाषण हे कुठल्याही दबावाखाली नसता ते खेळी मिळणे झाले तरच या गोष्टींवर ती मात करता येऊ शकते.
कुठलंही नातं असू दे त्यातला वादंग यात प्रेमभंग सुद्धा आले बर का! तर आत्महत्या हे एकच उत्तर असते का? खरंच आजकालचे मुलांचे जीव स्वस्त झालेत काय?
यात शेतकऱ्यांचा विषय तर वेगळाच आहे आणि त्या विषयात मी हात घालत नाही कारण त्याचा मला सखोल अभ्यासही नाही.
वरील पूर्ण लेख वाचता सर्वांना प्रश्न पडेल की, ही प्रश्न मालिका आहे की लेख आहे? कारण यात नुसते प्रश्न प्रश्न आणि उत्तर खरच सांगतोय कोणा जवळच नाही.